विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या सहा तीर्थक्षेत्रांना लवकरच विकासाची नवी झळाळी मिळणार असून आज त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक झाली. त्यामध्ये पुढील विषयांवर चर्चा झाली.Maharashtra will get a new wave of development; Bhimashankar, Parli Vaijnath, Ghrishneshwar included!!
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक :
✅ श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर आणि आदर्श गाव प्रकल्प विकास आराखडा
✅ श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर आणि परिसर विकास आराखडा
✅ श्री… pic.twitter.com/mTzz3aijIH— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 18, 2026
✅ श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर आणि आदर्श गाव प्रकल्प विकास आराखडा
✅ श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर आणि परिसर विकास आराखडा
✅ श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखडा, वेरुळ, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर
✅ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान देहू जि. पुणे येथील सर्वांगीण संवर्धन व विकास उपक्रम
✅ सातारा येथील किल्ले अजिंक्यतारा जतन, संवर्धन, परिसर सुशोभीकरण आणि पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा विकास
✅ महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या संगम माहुली, सातारा येथील समाधी स्थळांचे संवर्धन, पुनरुज्जीवन आणि परिसर विकास कामे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेऊन अधिकाऱ्यांना कामाच्या गुणवत्ते संदर्भात सूचना दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गणेश नाईक, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, आमदार दिलीप वळसे पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Maharashtra will get a new wave of development; Bhimashankar, Parli Vaijnath, Ghrishneshwar included!!
महत्वाच्या बातम्या
- NCW : राष्ट्रीय महिला आयोगाचा श्रीनगर मध्ये शक्ती संवाद; काश्मिरी महिलांना सुरक्षा आणि समानतेचा आधार!!
- खासदार श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौऱ्यात वाहनांच्या ताफ्यात कपात; बाईक रॅलींवर देखील कठोर बंदी!!
- राष्ट्रवादीतली भांडणे कमी पडली, म्हणून “कळलाव्यां”नी भाजप – शिवसेनेत काल्पनिक भांडणे सुरु केली!!
- Mamata Banerjee : ममता म्हणाल्या- ज्याला TMC सोडून जायचे आहे तो जाऊ शकतो; पक्षाला पुन्हा उभे करण्याचे आवाहन



Post Your Comment