Trending News

No trending news found.

Monday, 15 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Jayakumar Gore on Sharad Pawar : …तर समाजावर ही वेळ आली नसती ; मंत्री जयकुमार गोरे यांची शरद पवारावर टीका.

विशेष प्रतिनिधी मुंबई : Jayakumar Gore on Sharad Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनावर भाष्य करताना पवार म्हणाले, “तमिळनाडूमध्ये 72 टक्के आरक्षण शक्य आहे, तर महाराष्ट्रातही घटनादुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण दिले जाऊ शकते.” या विधानावर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी तीव्र टीका केली असून, पवार यांनी चार वेळा मुख्यमंत्री असताना हा मुद्दा का सोडवला नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. सत्ताधाऱ्यांची पवारांवर टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पवारांवर निशाणा साधताना म्हटले, “शरद पवार हे अभ्यासू नेते आहेत. पण आज ते जे मत […]

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Jayakumar Gore on Sharad Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनावर भाष्य करताना पवार म्हणाले, “तमिळनाडूमध्ये 72 टक्के आरक्षण शक्य आहे, तर महाराष्ट्रातही घटनादुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण दिले जाऊ शकते.” या विधानावर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी तीव्र टीका केली असून, पवार यांनी चार वेळा मुख्यमंत्री असताना हा मुद्दा का सोडवला नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.

सत्ताधाऱ्यांची पवारांवर टीका

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पवारांवर निशाणा साधताना म्हटले, “शरद पवार हे अभ्यासू नेते आहेत. पण आज ते जे मत मांडत आहेत, त्याचा अभ्यास त्यांनी सत्तेत असताना केला असता, तर ज्या समाजाने त्यांना राज्य आणि देशाचे नेते बनवले, त्यांच्यावर आज अशी वेळ आली नसती.”

इतर सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांनीही पवारांच्या कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, इतक्या वर्षांच्या अनुभवात त्यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटला नाही, असा टोला लगावला.



देवेंद्र फडणवीस यांचा बचाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 10-12 वर्षांत मराठा समाजासाठी आपल्या सरकारने मोठी कामगिरी केल्याचा दावा केला आहे. विरोधकांनी मराठा आंदोलकांना डावलले जात असल्याचा आरोप केला असताना, फडणवीस यांनी आपल्या सरकारच्या कृतीशीलतेचा पुनरुच्चार केला.
मंत्री गोरे यांनी फडणवीस यांचे समर्थन करताना म्हटले, “मराठा समाजासाठी आतापर्यंत जे काही झाले, ते फक्त देवेंद्र फडणवीस यांनी केले. जे लोक आज त्यांच्यावर चक्रव्यूह रचत आहेत, ते स्वतःच त्यात अडकतील. राज्यातील जनतेने फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवत विधानसभेत 237 जागांचे प्रचंड बहुमत दिले आहे. त्यामुळे कोण चक्रव्यूह रचत आहे, याला काही किंमत नाही.”

शरद पवार नेमके काय म्हणाले?

मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपले मत मांडले. “तमिळनाडूमध्ये 72 टक्के आरक्षण शक्य आहे, तर घटनेत बदल करून महाराष्ट्रातही मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते,” अशी भूमिका त्यांनी घेतली. या विधानानंतर राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

आंदोलनाची सध्याची स्थिती

मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनाला राज्याच्या विविध भागांतून मराठा समाजाचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. ग्रामीण भागातून आझाद मैदानात आंदोलकांसाठी जेवणाचे साहित्य पाठवले जात आहे. मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्याने शहर प्रशासनावर प्रचंड ताण येत आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक नुकतीच पार पडली. सरकारच्या वतीने एक शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला गेले होते, परंतु अद्याप आंदोलनावर कोणताही तोडगा निघालेला नाही.

…then this time would not have come for the society; Minister Jayakumar Gore’s criticism of Sharad Pawar.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment