Trending News

No trending news found.

Sunday, 14 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

Ranveer Singh : कांतारा मिमिक्रीचा वाद; कर्नाटक उच्च न्यायालयाने रणवीर सिंहचे माफीपत्र स्वीकारले

कांतारा चित्रपटात दाखवलेल्या देवतेला भूत म्हटल्याने कायदेशीर अडचणीत सापडलेल्या रणवीर सिंहला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अभिनेत्याचे माफीपत्र स्वीकारले आहे, मात्र अभिनेत्याने 4 आठवड्यांच्या आत चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन माफी मागावी अशी अट ठेवली आहे.

वृत्तसंस्था

बंगळुरू :Ranveer Singh  कांतारा चित्रपटात दाखवलेल्या देवतेला भूत म्हटल्याने कायदेशीर अडचणीत सापडलेल्या रणवीर सिंहला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अभिनेत्याचे माफीपत्र स्वीकारले आहे, मात्र अभिनेत्याने 4 आठवड्यांच्या आत चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन माफी मागावी अशी अट ठेवली आहे.Ranveer Singh

25 एप्रिल रोजी रणवीर सिंगने प्रतिज्ञापत्रात माफीपत्राचा समावेश केला होता. तेव्हा न्यायालयाने यावर विचार करण्यासाठी वेळ मागितला होता, तर तक्रारदाराचे म्हणणे आहे की, प्रतिज्ञापत्राला योग्य माफीपत्र मानले जाऊ शकत नाही. बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार, न्यायालयाने रणवीरचे माफीपत्र तोंडी स्वीकारून खटला रद्द करण्याची गोष्ट सांगितली आहे. तर दुसरीकडे अभिनेत्यासमोर अट ठेवली की त्याने म्हैसूरच्या मंदिरात जाऊन माफी मागावी.Ranveer Singh



वाद झाल्यानंतरही अभिनेत्याने मागितली होती माफी

डिसेंबर 2025 मध्ये वाद झाल्यानंतर लगेचच रणवीर सिंहने अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून माफी मागितली होती. त्याने लिहिले होते, माझा उद्देश (कांतारा) चित्रपटातील ऋषभच्या उत्कृष्ट अभिनयाला अधोरेखित करण्याचा होता. एक अभिनेता म्हणून, मला माहीत आहे की त्यांनी तो विशिष्ट सीन ज्या पद्धतीने साकारला, त्यासाठी किती मेहनत लागते आणि यासाठी मी त्यांचा खूप आदर करतो. मी नेहमीच आपल्या देशातील प्रत्येक संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचा मनापासून आदर केला आहे. जर माझ्या कोणत्याही बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून माफी मागतो.

काय आहे संपूर्ण वाद?

रणवीर सिंह गेल्या वर्षी IFFI (इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया) चा भाग होता. मंचावर अभिनेत्याने ‘कांतारा’ चित्रपटात दाखवलेल्या चावुंडी (चामुंडा) देवीची खिल्ली उडवली होती.

रणवीर सिंहने चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टीला सांगितले, ‘ऋषभ, मी हा (कांतारा) चित्रपट थिएटरमध्ये पाहिला होता. तो एक उत्कृष्ट परफॉर्मन्स होता, विशेषतः जेव्हा स्त्री भूत तुमच्या शरीरात येते. तो परफॉर्मन्स, तो एक शॉट उत्कृष्ट होता.’

फिल्म फेस्टिव्हलमधून रणवीर सिंहचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तो स्टेजवरून उतरल्यानंतरही ऋषभ शेट्टीसमोर चावुंडी देवीची नक्कल करताना दिसला आहे, मात्र, ऋषभ शेट्टी त्याला सतत इशारा करून थांबवताना दिसला आहे.

व्हिडिओ समोर आल्यानंतर अभिनेत्यावर जोरदार टीका झाली, त्यानंतर उच्च न्यायालयाचे वकील प्रशांत मेथल यांनी बंगळुरू येथील हाय ग्राउंड पोलिस ठाण्यात रणवीर सिंह यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने तक्रारीत लिहिले आहे की, रणवीर सिंह यांनी पूजनीय गुलिगा दैव यांची खिल्ली उडवली आणि त्यांना अपमानजनक व विनोदी पद्धतीने सादर केले, ज्यामुळे हिंदू आणि विशेषतः तुलू समुदायाशी संबंधित लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

यापूर्वी, 2 डिसेंबर 2025 रोजी हिंदू जनजागृती समितीने धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली रणवीर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांनी कायदेशीर कारवाईसोबत माफीचीही मागणी केली होती.

Kantara Mimicry Row: Karnataka HC Accepts Ranveer Singh’s Apology

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment