विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार हा या मातीतला असल्याने तो रुजला, या उलट मार्क्सवादी विचार हा आयात केला म्हणूनच कालबाह्य झालेला मार्क्सवाद आज संपला असून, संघाचा विचार मात्र जनमानसात खोलवर रुजला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी केले.
टिळक रस्त्यावरील लेडी रमाबाई सभागृहात आयोजित मला उमगलेला संघ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संगीतकार राहुल रानडे, प्रसिद्ध अभिनेते ऋषिकेश जोशी, पुस्तकाचे संपादक सुधीर जोगळेकर आणि ‘भारतीय विचार साधना’ (भाविसा) संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे व्यासपीठावर उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार भगवान दातार यांनी तोरसेकर यांच्याशी संवाद साधला.
संघाने १०० वर्षे पूर्ण केली. कम्युनिस्ट पार्टीला सुद्धा १०० वर्षे झाली, तरीसुद्धा कम्युनिस्ट चळवळ का लयाला गेली??, याचा उलगडा करताना तोरसेकर म्हणाले, “कम्युनिस्टांना आता भारताची मातीही मान्य नाही. सुरुवातीच्या काळात काही नेत्यांनी प्रयत्न केले, मात्र आता ही संपूर्ण चळवळ केवळ पुस्तकी राहिली आहे. या उलट संघ स्वयंसेवक समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आहे. संघ केवळ ज्ञानी लोक घडवत नाही, तर समाजासाठी उपयुक्त ठरणारे लोकसंग्राहक स्वयंसेवक निर्माण करतो.”
ऋषिकेश जोशी म्हणाले, “नाट्यकलेचा अभ्यास करताना २० वर्षे मी डाव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली होतो. मात्र, जगभरातील संस्कृती नष्ट होत असताना भारताची संस्कृती का टिकली, याचा अभ्यास केल्यावर संघ कार्यामागील बलस्थाने लक्षात आली. राष्ट्रभक्तीचा समान धागा मला संघाकडे आकर्षित करणारा ठरला.” राहुल रानडे म्हणाले, “संघाच्या शिस्तप्रियतेमुळेच ही संघटना १०० वर्षे टिकली आहे. संघ प्रार्थनेचे लंडनच्या ‘रॉयल ऑर्केस्ट्रा’मध्ये ५७ वादकांसह ध्वनिमुद्रण करणे, हा एक प्रकारे ‘काव्यगत न्याय’ आहे.” अॅड. क्षितीज गायकवाड: “बौद्ध समाजात जन्म झाल्यामुळे सुरुवातीला संघाविषयी मनात चुकीची मते होती, मात्र गिरीश प्रभुणे यांच्या सानिध्यात आल्यावर खरा संघ उमजला.” ‘भारतीय विचार साधना’ संस्थेने आतापर्यंत ६०० पुस्तकांचे प्रकाशन केले असून, समाजातील मान्यवरांची संघाविषयीची मते संकलित करण्याच्या उद्देशातून ‘मला उमगलेला संघ’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आल्याचे संपादक सुधीर जोगळेकर यांनी सांगितले. डॉ. गिरीश आफळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, दीपक जेवणे यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रीकृष्ण कात्रे यांनी आभार मानले.
– तर फुले-शाहू-आंबेडकर संघाच्या बाजूने…
यावेळी तोरसेकर यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले, “महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर वंचितांसाठी लढा दिला. ते कधीही ‘डावे’ नव्हते. ते आज हयात असते, तर नक्कीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठीशी उभे राहिले असते. दुर्दैवाने आजच्या चळवळीतील लोकांनी या महापुरुषांना नीट वाचलेले नाही.

“Publication of the book The Sangh as I Understood It
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांचा विरोध मोडून काढून महिलांना आरक्षण देण्याचा पण नरेंद्र मोदींचा दृढसंकल्प!!
- पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाड्यात 20-22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन!!
- Gold & Silver : 15 बँकांना सोने-चांदीच्या आयातीचा नवीन परवाना मिळाला; SBI, PNB आणि HDFC यादीत समाविष्ट
- Prakash Raj : प्रकाश राज यांच्या विरोधात गुन्हा दाखल; अभिनेत्यावर भगवान राम आणि रामायणाची खिल्ली उडवल्याचा आरोप



Post Your Comment