Trending News

No trending news found.

Tuesday, 19 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

नांदेडसह मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ५ ठार, हजारो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात हाहाकार माजवला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात तब्बल ४२ वर्षांनंतर अशी विक्रमी अतिवृष्टी झाली आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात हाहाकार माजवला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात तब्बल ४२ वर्षांनंतर अशी विक्रमी अतिवृष्टी झाली आहे. फक्त २४ तासांत ३५५ मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली. त्यामुळे नांदेडसह हिंगोली, बीड आणि इतर जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

# नांदेडमध्ये विक्रमी पाऊस, गावे पाण्याखाली

* नांदेड जिल्ह्यातील ९ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.
* मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी मंडळात ३५४.७५ मिमी, मुक्रमाबाद मंडळात २०६ मिमी पाऊस पडला.
* लेंडी प्रकल्पाची पाणीपातळी वाढून रावणगाव, भिंगोली, भासवाडी, भेंडेगाव (खु.), हसनाळ व सांगवी भादेव या सहा गावांना पुराचा वेढा बसला.
* यामुळे ४ महिला व १ पुरुष बेपत्ता झाले. त्यापैकी २ महिलांचे मृतदेह सापडले असून तिघांचा शोध सुरू आहे.
* जिल्ह्यातील २२५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

# हिंगोली व बीडमध्ये जीवितहानी

* हिंगोलीत घोरदरी गावातील शेतकरी पाण्यात वाहून गेला, तर औंढा तालुक्यातील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला.
* बीड जिल्ह्यात परळी तालुक्यात चार तरुण कारसह वाहून गेले. तिघांना वाचवले गेले पण एकाचा मृत्यू झाला.
* नांदेड व हिंगोलीत प्रत्येकी दोन, बीडमध्ये एक अशा एकूण ५ मृत्यूंची नोंद झाली.
* १५० पेक्षा अधिक जनावरे वाहून गेल्याचे प्रशासनाने सांगितले.

# मुंबईत जोरदार सरी, वाहतुकीवर परिणाम

* सोमवारी सकाळी ६ ते सायंकाळी ५.३० या वेळेत मुंबईत १७० मिमी पाऊस झाला.
* चेंबूरमध्ये सर्वाधिक १७७ मिमी पाऊस नोंदला गेला.
* शहरातील १४ ठिकाणी पाणी साचले, दोन ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली.
* लोकल ट्रेन काही विलंबाने धावल्या, पण मेट्रो सेवा पूर्णपणे सुरळीत होती.
* २० विमानांच्या उड्डाणांना रद्द करावे लागले.



# विदर्भ व गडचिरोलीतही जनजीवन विस्कळीत

* अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा धरणाचे १० दरवाजे उघडले, बुलडाण्यातील पेनटाकळी प्रकल्पाचे ९ दरवाजे उघडले.
* अमरावती जिल्ह्यात अपर वर्धा प्रकल्प ६५% क्षमतेपर्यंत भरला.
* गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे रस्ते वाहून गेले व वाहतूक ठप्प झाली.
* अमरावती व गडचिरोलीला ऑरेंज, नागपूरला यलो अलर्ट जारी.

# मराठवाड्यात मोठे कृषी नुकसान

* छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात १४ ते १८ ऑगस्टदरम्यान १००४ गावे बाधित झाली.
* ६ जणांचा मृत्यू, २०५ जनावरे दगावली.
* ३,२९,५०९ शेतकरी बाधित झाले असून २.८० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले.
* यामध्ये जिरायत पीक सर्वाधिक बाधित झाले, तसेच बागायत व फळपीकांचेही मोठे नुकसान झाले.

# कोकणातही अलर्ट, कोल्हापूरात पंचगंगा नदी धोक्याजवळ

* मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी.
* रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला.
* कोल्हापूरातील राधानगरी धरणाचे सर्व ७ दरवाजे उघडले.
* पंचगंगा नदी ५व्यांदा पात्राबाहेर गेली असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी जोरदार पावसाचा इशारा दिल्याने लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Heavy Rains in Nanded Marathwada Kill 5

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment