Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Chief Minister : मिसिंग लिंक नाही, तर कनेक्टिंग लिंक म्हणा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन; तत्कालीन ठाकरे सरकारची 13 कारणे फेटाळली, सुप्रिया सुळेंनाही प्रत्युत्तर

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित 13 किमी लांबीच्या नव्या मार्गिकेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या मार्गाला आतापर्यंत मिसिंग लिंक, म्हणून ओळखले जात होते. मात्र उद्घाटनावेळी फडणवीस यांनी याला कनेक्टिंग लिंक, म्हणावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाल्याने महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे लोकार्पणाचा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाला.

विशेष प्रतिनिधी

पुणे : Chief Minister मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित 13 किमी लांबीच्या नव्या मार्गिकेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या मार्गाला आतापर्यंत मिसिंग लिंक, म्हणून ओळखले जात होते. मात्र उद्घाटनावेळी फडणवीस यांनी याला कनेक्टिंग लिंक, म्हणावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाल्याने महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे लोकार्पणाचा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाला.Chief Minister

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कुसगाव ते खोपोली या टप्प्यातील हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ने या मार्गिकेची उभारणी केली आहे. या नवीन जोडमार्गामुळे मुंबई ते पुणे प्रवासाचा कालावधी सुमारे 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच एकूण अंतरही अंदाजे 6 किमीने घटणार आहे.Chief Minister



मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या अभियंत्यांचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, हा मार्ग उभारण्यासाठी अनेक वर्षे नियोजन आणि तांत्रिक अभ्यास करण्यात आला. या प्रकल्पामुळे केवळ वेळच नव्हे तर इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. दररोज कोट्यवधी रुपयांच्या इंधनाची बचत होऊन पर्यावरणालाही फायदा होणार आहे.

या नव्या मार्गिकेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे उभारण्यात आलेला 182 मीटर उंचीचा केबलस्टेड पूल. हा पूल जगातील सर्वात उंच केबलस्टेड पुलांपैकी एक मानला जात आहे. नदीवर उभारलेला हा पूल अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. त्यामुळे या प्रकल्पामुळे जागतिक स्तरावरही एक विक्रम प्रस्थापित झाल्याचा दावा करण्यात आला.

या प्रकल्पाच्या इतिहासावर प्रकाश टाकताना मुख्यमंत्री म्हणाले की, 2010 साली या मार्गाची संकल्पना मांडण्यात आली होती. त्यानंतर अभ्यास झाला, अहवाल तयार झाला. मात्र आधीच्या सरकारने हा प्रकल्प होऊ शकत नाही, अशी 13 कारणे दिली होती. लोणावळा परिसरातील तलावाच्या खाली मार्ग जाणार असल्यामुळे तो शक्य नाही, असेही एक कारण देण्यात आले होते.

महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली. फडणवीस यांनी एमएसआरडीसीचे अधिकारी मोपलवार आणि आनंद कुलकर्णी यांच्याशी चर्चा करून हा मार्ग शक्य असल्याचा विश्वास घेतला. डिसेंबर 2015 मध्ये जुन्या निर्णयात बदल करून हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि कामाला सुरुवात झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली.

https://x.com/i/status/2050130491102076934

अभियांत्रिकी आव्हानांचा सामना

या मार्गाच्या बांधकामात अनेक अभियांत्रिकी आव्हानांचा सामना करावा लागला. विशेषतः केबलस्टेड पूल उभारताना जोरदार वाऱ्यांचा मोठा अडथळा होता. रायगड ते पुणे दरम्यान वाऱ्याचा वेग वेगवेगळा असल्याने त्यानुसार पुलाची रचना करण्यात आली. या पुलाची क्षमता ताशी 240 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यालाही तग धरण्याची असल्याचे सांगण्यात आले.

पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर

फडणवीस यांनी यावेळी निसर्ग चक्रीवादळाचा उल्लेख करत सांगितले की, त्या वेळी वाऱ्याचा वेग 130 ते 155 किमी प्रतितास होता. मात्र हा पूल त्यापेक्षा दुप्पट वेगाच्या वाऱ्यातही सुरक्षित राहू शकतो. एकूणच, या कनेक्टिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असून हा प्रकल्प राज्याच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर घालणारा ठरणार आहे.

Call it a connecting link, not a missing link; Chief Minister’s appeal; 13 reasons of the then Thackeray government rejected, also responded to Supriya Sule

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment