Trending News

No trending news found.

Tuesday, 19 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Shashikant Shinde : “ …. नाही तर सत्ता शरद पवारांकडे द्या ! ” ; शशिकांत शिंदे यांची फडणवीसांवर टीका.

विशेष प्रतिनिधी   पुणे: Shashikant Shinde : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनामुळे सत्ताधारी आणि विरोधी […]

विशेष प्रतिनिधी

 

पुणे: Shashikant Shinde : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “जर दहा-बारा वर्षे सत्तेत राहूनही तुम्हाला आरक्षणाचा मार्ग काढता येत नसेल, तर सत्ता शरद पवारांकडे द्या, ते नक्की मार्ग काढतील,” असे शिंदे यांनी गणपती दर्शनासाठी पुण्यात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले.

विरोधकांवर फडणवीसांचा पलटवार, शिंदेंचे प्रत्युत्तर

सत्ताधारी पक्षाकडून मराठा आणि ओबीसी आरक्षणावर विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे वारंवार सांगितले जात आहे. यावर शिंदे म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, हीच आमची स्पष्ट भूमिका आहे. आता सरकारने आपली भूमिका जाहीर करावी. सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यामुळेच जरांगे पाटील यांना उपोषणाला बसावे लागले आहे.”

अजित पवारांवरही टीकास्त्र

शिंदे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार मंत्रिमंडळात होते. त्यावेळी आमची भूमिका आरक्षण देण्याची नव्हती, असे काही जण म्हणतात. मग आता अजित पवार यांनी त्यांच्या तत्कालीन आणि आताच्या भूमिकेचे स्पष्टीकरण द्यावे,” असे शिंदे म्हणाले.



मुंबईकरांना आंदोलनाचा त्रास

सणासुदीच्या काळात मुंबईत सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत शिंदे यांनी सरकारवर टीका करताना म्हटले, “सरकार फक्त आश्वासनांवर आश्वासने देत आहे, पण एकही आश्वासन पूर्ण करत नाही. आंदोलन पेटवायचे की समजायचे, हे सरकारने ठरवावे. समाजात तेढ निर्माण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. विरोधकांवर खापर फोडण्यापेक्षा सरकारने कृतीतून काहीतरी दाखवावे,” असे आव्हान त्यांनी दिले.

सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी विरोधकांवर टीका करताना म्हटले होते की, विरोधी पक्ष मराठा आंदोलनाच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. यावर प्रत्युत्तर देताना विरोधकांनी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा समाजाला आंदोलन करावे लागत असल्याचा आरोप केला आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा आगामी निवडणुकांवर कसा परिणाम करेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या तरी या मुद्द्यावरून राजकीय पक्षांमधील वाद तीव्र झाले असून, याचा थेट परिणाम सामान्य जनतेवर होताना दिसत आहे.

“…. Otherwise, give power to Sharad Pawar!”; Shashikant Shinde’s criticism of Fadnavis.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment