Trending News

No trending news found.

Wednesday, 17 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

भारतात लॉकडाऊनची शक्यता तीन मंत्र्यांनी स्पष्ट फेटाळली; पेट्रोल – डिझेल वरील उत्पादन शुल्कात कपात!!

कच्च्या तेलाच्या संकटात केंद्र सरकारने तेल कंपन्यांना आणि सामान्य जनतेला दिलासा देत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या संकटात केंद्र सरकारने तेल कंपन्यांना आणि सामान्य जनतेला दिलासा देत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साइज ड्यूटी) कपात केली. त्याचवेळी भारतात लोक डाऊन लागण्याची शक्यता तीन मंत्र्यांनी फेटाळून लावली.

पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपये प्रति लिटर होते, जे आता 10 रुपयांनी कमी करून 3 रुपये करण्यात आले, तर डिझेलवरील हे शुल्क 10 रुपये प्रति लिटर होते, ते आता पूर्णपणे रद्द करून शून्य करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे तेल कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतली वाढ रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे

– लॉकडाऊनची शक्यता फेटाळली

गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असून, त्या प्रति बॅरल ७० डॉलरवरून १०० डॉलरच्या वर गेल्या आहेत. यामुळे जगभरात इंधनाच्या दरात ३०% ते ५०% वाढ झाली आहे. भारतातील तेल कंपन्यांना सध्या पेट्रोलवर प्रति लिटर २४ रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर ३० रुपयांचा तोटा होत आहे. कंपन्यांवरील हा दबाव कमी करण्यासाठी कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली. देशात लॉकडाऊनची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री किरण रीजिजू यांनी देखील लॉकडाऊनची शक्यता फेटाळली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा विरोधकांनी विपर्यास केल्याचे हरदीप सिंग पुरी म्हणाले. लॉकडाऊनच्या अफवा पसरविणे हा गुन्हाच आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

– पेट्रोल ५ रुपयांनी आणि डिझेल ३ रुपयांनी महाग

काल सकाळी, नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ₹5 आणि डिझेलच्या दरात ₹3 ने वाढ केली. आता भोपाळमध्ये कंपनीच्या पेट्रोलचा दर ₹111.72 आणि डिझेलचा दर ₹94.88 वर पोहोचला आहे. नायरा एनर्जीची ही दरवाढ स्थानिक कर आणि व्हॅटनुसार राज्यानुसार बदलू शकते.

इराण युद्धावर आज मुख्यमंत्र्यांशी बोलणार मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 मार्च रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. इराण युद्धानंतरच्या परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. निवडणूक असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यात सहभागी होणार नाहीत.

24 मार्च रोजी मोदी राज्यसभेत म्हणाले की, इराणसोबतचे युद्ध असेच सुरू राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. येणारा काळ हा कोविड-१९ महामारीप्रमाणेच परीक्षेचा असेल. केंद्र आणि राज्य सरकारांना एकत्र काम करावे लागेल.

मात्र, सरकारने आज देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या तुटवड्याचे वृत्त फेटाळून लावले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने म्हटले आहे की, जागतिक परिस्थिती कशीही असली तरी, भारताकडे 60 दिवसांसाठी पुरेल इतका पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे.

Three Ministers Clearly Rule Out Possibility of Lockdown in India

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment