Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Jitendra Awhad : शिवरायांबाबतच्या विधानावरून विधानसभेत वादंग; दादा भुसे, नितेश राणेंचा आक्रमक पवित्रा; जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी

विधानसभेत धर्मस्वातंत्र्य विधेयकावर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाबाबत दिलेल्या एका संदर्भामुळे सभागृहात वादाचे वातावरण निर्माण झाले. इतिहासातील विविध दाखले देत असताना आव्हाड यांनी केलेल्या या विधानावर आक्षेप घेतला गेल्याने मोठा गदारोळ झाला. या पार्श्वभूमीवर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलगिरी व्यक्त करण्याचे निर्देश दिले, ज्याची तातडीने दखल घेत आव्हाड यांनी सभागृहाची माफी मागितली आणि या वादावर पडदा पडला.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Jitendra Awhad  विधानसभेत धर्मस्वातंत्र्य विधेयकावर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाबाबत दिलेल्या एका संदर्भामुळे सभागृहात वादाचे वातावरण निर्माण झाले. इतिहासातील विविध दाखले देत असताना आव्हाड यांनी केलेल्या या विधानावर आक्षेप घेतला गेल्याने मोठा गदारोळ झाला. या पार्श्वभूमीवर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलगिरी व्यक्त करण्याचे निर्देश दिले, ज्याची तातडीने दखल घेत आव्हाड यांनी सभागृहाची माफी मागितली आणि या वादावर पडदा पडला.Jitendra Awhad

जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेत शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई, दादा भुसे आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा स्वीकारला. शंभूराज देसाई यांनी आव्हाडांचे वक्तव्य विधिमंडळाच्या पटलावरून त्वरित काढून टाकण्याची मागणी केली. सत्ताधारी बाकांवरील आमदारांच्या या जोरदार घोषणाबाजीमुळे आणि वाढत्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले.Jitendra Awhad



सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आव्हाडांनी दिलगिरी व्यक्त केली, तरीही नितेश राणे, योगेश सागर आणि दादा भुसे यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. आमदारांची ही आक्रमक भूमिका आणि सभागृहातील तणाव कायम असल्याचे पाहून अध्यक्षांनी आव्हाडांना माफी मागण्यास सांगितले, ज्यानंतर त्यांनी सभागृहाची औपचारिक माफी मागितली आणि या वादावर पडदा पडला.

धर्मस्वातंत्र्य विधेयकावर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाड म्हणाले, कलम 295, 410 या तरतुदी अस्तित्वात आहे. जबरदस्तीने धर्मांतराला सर्वांचाच विरोध आहे. कायद्यात डॉ. बाबासाहेबांनी धर्म स्वातंत्र्याचे अधिकार देऊन ठेवले आहेत. त्याच नावाने महाराष्ट्रात बिल आणणे म्हणजे मूळ कायद्याला छेद देणे आहे. पुढे ते म्हणाले, बुद्धाने धर्म का सोडला? गौतम बुद्ध यांनी केलेले धर्मांतरण देशातले पहिले धर्मांतरण. मग आजच्या कायद्याने त्यांनाही जेलमध्ये जावे लागले असते. महावीरांना जेलमध्ये घाला. बसवेश्वर यांना जेलमध्ये घाला. विद्रोह हा महाराष्ट्राचा कणा आहे.

Chaos in Assembly Over Jitendra Awhad’s Remark on Shivaji Maharaj; Apology Issued VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment