Trending News

No trending news found.

Tuesday, 10 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

Parliament : संसदेच्या अधिवेशनात इराण युद्धाच्या चर्चेवरून गदारोळ, बिर्लांविरोधात प्रस्ताव लांबणीवर, दुसऱ्या टप्प्यात कामकाज ठप्प

सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी लोकसभेत अमेरिका-इराण युद्धावर चर्चा करण्याच्या मागणीवरून प्रचंड गोंधळ झाला. सभागृहाचे कामकाज वारंवार विस्कळीत झाले, ज्यामुळे सभापती ओम बिर्ला यांना हटवण्याच्या विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा थांबली.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : Parliament सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी लोकसभेत अमेरिका-इराण युद्धावर चर्चा करण्याच्या मागणीवरून प्रचंड गोंधळ झाला. सभागृहाचे कामकाज वारंवार विस्कळीत झाले, ज्यामुळे सभापती ओम बिर्ला यांना हटवण्याच्या विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा थांबली.Parliament

सभागृहाची सुरुवात माजी खासदारांना श्रद्धांजली अर्पण करून झाली आणि दुपारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. सभागृह पुन्हा सुरू झाल्यावर, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर पश्चिम आशियातील परिस्थितीवर निवेदन देण्यासाठी उभे राहिले, परंतु विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यानंतर कामकाज तहकूब केले.Parliament



जयशंकर राज्यसभेत म्हणाले : भारतीयांची सुरक्षा प्राथमिकता

राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी प. आशिया युद्धावर चर्चा करण्याची मागणी केली. प्रत्युत्तरात, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, भारत या प्रदेशातील तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक कूटनीतीला पाठिंबा देतो. संघर्षानंतर ६७,००० भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणले आहे. सरकार भारतीय नागरिकांची सुरक्षितता, ऊर्जा पुरवठा, व्यापार हितसंबंधांना प्राधान्य देते. विरोधी पक्षांनी घोषणाबाजी केल्याने ३ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.

३ वर्षांत किमान बॅलन्स दंडातून ८,०९२ कोटी वसूल केले

२०२२-२३ ते २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षात बँक खात्यांमध्ये किमान मासिक सरासरी शिल्लक (एमएबी) न ठेवल्याबद्दल बँकांनी ग्राहकांकडून हजारो कोटी रुपये दंड वसूल केला. या कालावधीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी एकूण ₹८,०९२.८३ कोटी रुपये वसूल केले. अहवालात तीन प्रमुख ट्रेंड उघड केले आहेत. खासगी बँकांमध्ये, एचडीएफसी बँकेने सर्वाधिक, ₹३,८७२ कोटी रुपये वसूल केले.

१७२६ कोटी रुपयांतून ५४ मंदिर-तीर्थ कॉरिडॉर प्रकल्प

केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत देशभरात ५४ मंदिर-तीर्थक्षेत्र कॉरिडॉर आणि तीर्थक्षेत्र विकास प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांवर अंदाजे १,७२६ कोटी रु. खर्च केले जात आहेत व हे प्रकल्प २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवले जात आहेत. राजस्थानमध्ये सर्वाधिक चार प्रकल्प मंजूर झाले आहेत. बिहारमधील पाटणासाहिब, महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरचा यात समावेश आहे.

Parliament Adjourned: Uproar Over US-Iran War; Om Birla Motion Delayed VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment