Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Asha Bhosle : अष्टपैलू सूर हरपला!!

वयाच्या ९२ वर्षी आशा भोसले यांनी एक्झिट घेतली आणि ७० वर्षांची सूरसाधना सगळ्या जगाला देऊन एक अष्टपैलू सूर आपल्यातून निघून गेला.

वयाच्या ९२ वर्षी आशा भोसले यांनी एक्झिट घेतली आणि ७० वर्षांची सूरसाधना सगळ्या जगाला देऊन एक अष्टपैलू सूर आपल्यातून निघून गेला.Asha Bhosle: The versatile tune has been lost!!

स्वर देवतेच्या कृपेचे वरदान लाभलेल्या मंगेशकर घराण्यात आशाताईंचा जन्म झाला. मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या छत्रछायेखाली त्या वाढल्या. पण पितृछत्र त्यांना दीर्घकाळ लाभू शकले नाही. लता मंगेशकर यांच्याच छायेखाली त्या दीर्घकाळ वावरल्या.

लता मंगेशकर यांची कारकीर्द ऐन भरात असताना त्यांच्या दीप्तीखाली आशाताई आणि अन्य भावंडांची सांगीतिक कारकीर्द झाकोळली जाती की काय असे वाटत असतानाच आशाताईंनी वेगळी वाट चोखाळली तिच्यात फार मोठे अडथळे आले पण आपल्या सूर साधनेने आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी मोठी झेप घेतली. संगीतकार ओ. पी. नय्यर, आर. डी. बर्मन यांच्यासारख्या संगीतकारांनी आशाताईंमधील प्रतिभा ओळखली. त्यांच्या अष्टपैलू सुरांना स्वरसाज बांधणारी गीते सादर केली. त्यामुळे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आशाताईंची स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण झाली.



– १९४३ पासून कारकीर्द

आशा आणि लता यांनी लहान वयापासूनच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. १९४३ मध्ये, त्यांनी ‘माझा बाळ’ या मराठी चित्रपटात आपले पहिले गाणे गायले आ

णि १९४८ मध्ये, ‘चुनरिया’ या हिंदी चित्रपटातील ‘सावन आया’ या गाण्याद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

– अष्टपैलू सूर

आशा भोसले यांनी २० हून अधिक भाषांमध्ये १२,००० हून अधिक गाणी गायली आहेत. त्यांनी शास्त्रीय, गझल, भजन, कव्वाली, पॉप, कॅबरे ते आधुनिक बीट्स अशा प्रत्येक संगीत प्रकारात आपली छाप सोडली आहे. ‘पिया तू अब तो आ जा’, ‘दम मारो दम’, ‘दिल चीज क्या है’ आणि ‘मेरा कुछ सामान’ यांसारख्या अजरामर गीतांनी त्यांच्या आवाजात जादू केली. आर. डी. बर्मन यांच्यासोबत त्यांनी भारतीय संगीतात एक सुवर्ण अध्याय लिहिला. त्यांनी किशोर कुमार यांच्यासोबत अनेक अविस्मरणीय गाणी गायली.

– खासगी आयुष्यात वादळे

आशा भोसले यांच्या आयुष्याची सुरुवात सोपी नव्हती. वयाच्या १६ व्या वर्षी, त्यांनी पळून जाऊन गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केले, जे त्यावेळी ३१ वर्षांचे होते. कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध घेतलेला हा निर्णय त्यांना खूप महागात पडला. नंतर ते विभक्त झाले आणि त्या दोन मुले व एका गरोदर स्त्रीसह माहेरी परतल्या. त्यांचा तिसरा मुलगा आनंद याच्या जन्मानंतर त्यांनी स्वतःला संगीतासाठी वाहून घेतले. पुढे, १९८० मध्ये त्यांनी संगीतकार राहुल देव बर्मन (पंचम) यांच्याशी लग्न केले.

– गिनीज बुक मध्ये नोंद

संगीताव्यतिरिक्त, आशा भोसले यांनी उद्योजकतेतही प्रावीण्य मिळवले. त्यांनी ‘आशा’ नावाची रेस्टॉरंट साखळी सुरू केली, जी आजही लोकप्रिय आहे. तिने दूरदर्शनवर परीक्षक म्हणूनही काम केले.आशा भोसले यांनी सात फिल्मफेअर पुरस्कार (सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका), दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार (२०००) आणि पद्मविभूषण (२००८) यांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सर्वाधिक गाणी असलेली कलाकार म्हणून त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद आहे.

Asha Bhosle: The versatile tune has been lost!!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment