Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

विलीनीकरणाच्या विषयाला जयंत पाटलांकडून पुन्हा उकळी; भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जायची तडफड दिसली!!

विलीनीकरणाच्या विषयाला जयंत पाटलांकडून पुन्हा उकळी; भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जायची तडफड दिसली!!, हेच राजकीय वास्तव जयंत पाटलांनी झी24तासला दिलेल्या मुलाखतीतून समोर आले.

नाशिक : विलीनीकरणाच्या विषयाला जयंत पाटलांकडून पुन्हा उकळी; भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जायची तडफड दिसली!!, हेच राजकीय वास्तव जयंत पाटलांनी झी24तासला दिलेल्या मुलाखतीतून समोर आले.

– रोहित पवारांची राजकीय मुशाफिरी

भाजप, सुनेत्रा पवार, अजित पवारांची मुले, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या सगळ्या नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा विषय बासनात गुंडाळून ठेवल्यानंतर रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचा विषय घातपात ठरविण्यासाठी जंग जंग पछाडले. त्यांनी दिल्लीत जाऊन मोठी राजकीय मुशाफिरी करून घेतली. त्यांनी भाजप बरोबरच तेलगु देशम पक्षातल्या नेत्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले. पण त्यामुळे विलीनीकरणाचा विषय कायमचा गुंडाळला गेला. अर्थात त्याचा तोटा रोहित पवारांच्या बरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना सुद्धा सहन करावा लागला. त्यांना भाजपच्या सत्तेच्या तुकड्याचा लाभ झाला नाही.



विलीनीकरणाच्या विषयाला उकळी

त्यामुळेच आज जयंत पाटलांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीतून विलीनीकरणाच्या विषयाला पुन्हा उकळी दिली. अजित पवारांबरोबर 17 जानेवारीची बैठक झाली. त्याआधी 16 जानेवारीला माझ्या घरी बैठक झाली. त्यावेळी बारामतीला जाऊन पवार साहेबांना सगळे सांगायचे ठरले, की माझे 40 आमदार मी सांगेन ते ऐकतील, असे अजित पवार म्हणाले होते. मी त्यांच्याबरोबर सत्तेत सोबत यावे, असे अजित पवारांना वाटत होते. त्यांची तशी तीव्र इच्छा होती. पण राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची तारीख जाहीर करण्याचा आदल्या दिवशी कसा काय अपघात झाला??, असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केला. या सवालातून त्यांनी भाजप आणि सुनेत्रा पवार यांना संशयाच्या कटघऱ्यात उभे केले.

सत्तेच्या वळचणीला जायची तडफड

पण या मुलाखतीतून जयंत पाटलांची भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जायची तीव्र इच्छाच दिसून आली. त्या पलीकडे या मुलाखतीतून कुठलेही राजकीय सत्य बाहेर आले नाही. कारण जयंत पाटलांनी बरोबर झालेल्या बैठकांमध्ये कुठलेही वेगळे सत्य बाहेर काढले नाही. आत्तापर्यंत अनेकांनी बोलून दाखविलेल्या राजकीय गोष्टींनाच त्यांनी या मुलाखतीतून उकळी दिली.

Jayant Patil reignites the issue of the merger.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment