Trending News

No trending news found.

Tuesday, 9 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Sharad Pawar : शरद पवारांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता भरला उमेदवारी अर्ज; निवडणूक अधिकाऱ्यांनी घरी जाऊन प्रक्रिया केली पूर्ण

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत भाजपचे चार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचा प्रत्येकी एक, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळच्या उमेदवारी अर्जाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शरद पवार यांनी प्रत्यक्ष निवडणूक कार्यालयात उपस्थित न राहता आपला अर्ज दाखल केला आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sharad Pawar  राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत भाजपचे चार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचा प्रत्येकी एक, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळच्या उमेदवारी अर्जाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शरद पवार यांनी प्रत्यक्ष निवडणूक कार्यालयात उपस्थित न राहता आपला अर्ज दाखल केला आहे.Sharad Pawar

सर्वोच्च न्यायालयाच्या 1968 मधील ‘पशुपतीनाथ विरुद्ध हरिहर प्रसाद सिंग’ या खटल्यातील निवाड्यानुसार, प्रकृती किंवा इतर वैध कारणास्तव उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसेल, तर राज्यघटनेच्या कलम 84(अ) अन्वये विहित नमुन्यात शपथ घेणे बंधनकारक असते. याच कायदेशीर तरतुदीचा आधार घेत, जेजे रुग्णालयाचे अधीक्षक संजय सुरवसे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची रीतसर शपथ घेतली. त्यानंतर, त्यांचे प्रस्तावक जयंत पाटील यांनी विधिमंडळात निवडणूक अधिकाऱ्यांकडे हा उमेदवारी अर्ज सुपूर्द केला.Sharad Pawar



शरद पवार यांनी यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून दोन स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत, ज्यामध्ये एक पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून तर दुसरा अपक्ष म्हणून आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात शरद पवार यांनी अशा प्रकारे प्रत्यक्ष उपस्थित न राहता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोर पालन करून, तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून दोन अर्ज भरण्यात आले आहेत.

राज्यसभेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनपेक्षित घडामोडी घडल्या असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने केवळ ज्योती वाघमारे यांचाच अर्ज भरल्याने आणि रोहित टिळक यांची उमेदवारी मागे घेतल्याने ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे. राज्यातील सात जागांसाठी एकूण सातच उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, यामध्ये सत्ताधारी महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे चार, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि शिवसेनेचा एक, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचा समावेश आहे. सात जागांसाठी सातच उमेदवार रिंगणात उरल्याने आता मतदानाची औपचारिकता उरली नसून ही निवडणूक बिनविरोध पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Sharad Pawar Files Rajya Sabha Nomination from Home; Jayant Patil Submits Form VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment